शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींच्या स्मृती अजूनही सांगलीकरांच्या हृदयात... इंदिरा गांधी जयंती विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:11 IST

श्रीनिवास नागे ।दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सांगलीचे ऋणानुबंध सत्तरच्या दशकात जुळले आणि अनेक वर्षे कायम राहिले. काँग्रेस पक्ष आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे इंदिराजींचे सांगलीशी दृढ बंध निर्माण झाले होते. इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवणींना दिलेला उजाळा...१९६९ मध्ये देशभर काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. इंदिरा ...

ठळक मुद्देवसंतदादांचे संगठन कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना १९८० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची आॅफर दिली होतीवसंतदादांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन राज्यातील नेतृत्व बदलण्याचे सुचविले.

श्रीनिवास नागे ।दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सांगलीचे ऋणानुबंध सत्तरच्या दशकात जुळले आणि अनेक वर्षे कायम राहिले. काँग्रेस पक्ष आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे इंदिराजींचे सांगलीशी दृढ बंध निर्माण झाले होते. इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवणींना दिलेला उजाळा...

१९६९ मध्ये देशभर काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. इंदिरा गांधीपुरस्कृत इंडिकेट काँग्रेस आणि श्रेष्ठींची म्हणजे संघटना काँग्रेसची सिंडीकेट अशी फूट पडली. त्यावेळी वसंतदादा प्रदेशाध्यक्ष होते. १९७१ ला संघटना काँग्रेस, जनसंघ आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांनी आघाडी तयार करून ‘इंदिरा हटाव’चा नारा दिला. त्यावेळी दादांनी इंदिरा गांधींच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका घेतली. १९७२ मध्ये वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असताना इंदिरा गांधींनीच त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केल्याने दादा पाटबंधारेमंत्री झाले.

पुढे आणीबाणीनंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली. त्यावेळी वसंतदादांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन राज्यातील नेतृत्व बदलण्याचे सुचविले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाली. त्यात दादा निवडून येऊन मुख्यमंत्री बनले. १९७८च्या दरम्यान काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) काँग्रेस असे दोन भाग झाले. हा वाद मिटवण्यासाठी दादांनी प्रयत्न केले. १९७९ मध्ये समाजवादी काँग्रेसमधील दादांसह शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, स. का. पाटील, नरेंद्र तिडके हे नेते पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दादा सांगलीतून खासदार बनले.

वसंतदादांचे संगठन कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना १९८० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची आॅफर दिली होती. मात्र दादांनी ती नाकारली. अखेर इंदिराजींनी त्यांच्यावर २० आॅगस्ट १९८० रोजी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली. १९८३ च्या सुरुवातीस दादा पुन्हा राज्यात परतले. ३१ जानेवारीस काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात दादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी लढत झाली. दादा निवडून आले. त्यांच्या त्या विजयामागेही इंदिरा गांधींच्या ‘सदिच्छा’ होत्या...काँग्रेस भवनचे उदघाटनतत्कालीन दक्षिण सातारा म्हणजे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस भवनचे उद्घाटन तत्कालीन अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्याहस्ते १३ आॅक्टोबर १९५९ रोजी झाले होते. त्याची कोनशीला सांगलीतील या काँग्रेस भवनात आहे.दादांच्या विरोधात प्रचारसभा१९७८ मध्ये महाअधिवेशन बोलावण्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडली. फेब्रुवारीत निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी कॉँग्रेस (रेड्डी-यशवंतराव चव्हाण) अशी पक्षाची विभागणी झाली. दादा समाजवादी काँग्रेसमध्ये गेले. निवडणुकीत दादांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसमधून थांबलेल्या युसूफ शेख यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधींनी स्वत: सांगलीत येऊन सभा घेतली होती.शालिनीतार्इंसाठी विराट सभामे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वसंतदादा खासदार असल्याने शालिनीताई पाटील यांना सांगलीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी १४ मे १९८० रोजी इंदिरा गांधी यांची सांगलीत विराट सभा झाली होती.आष्टा नगरपालिकेस भेटआष्टा नगरपालिकेसही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती. त्यांच्याहस्ते घरकूल योजनेचे उद्घाटन झाले होते. यावेळी विलासराव शिंदे, विजयमाला वग्याणी, मंदाकिनी रूकडे, गणपतराव कासार उपस्थित होते.आठवण पैलवानांचीवसंतदादा पाटील पाटबंधारेमंत्री असताना महाराष्टÑातील पैलवानांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्यास दिल्लीला गेले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा आणि हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दादू चौगुले आदींनी छायाचित्र काढून घेतले होते.